गांधी टोपीचा महीमा
गांधी टोपी हि शुभ्र पांढरया रंगाच्या खादी च्या कापडा पासून बनवलेली असायची. अशा टोपीसोबत महात्मा गांधींचे नाव जोडून हिला गांधी टोपी म्हणतात परंतु या टोपीच्या निर्मितीचा आणि गांधीजींचा काही हि संबंध नाही. मुळात हि टोपी उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या ठिकाणी खूप पूर्वी म्हणजे गांधीजींच्या जन्माच्या खूप आधी पासून वापरत असत. गांधीजींनी ह्या टोपीचा जास्त प्रसार केला. जेंव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते तेंव्हा इंग्रजान्द्वारे केल्या जाणारया अत्त्याचाराने दुःखी होऊन त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला.त्या वेळी इंग्रजांचा एक नियम होता हाताचे ठसे घेण्याचा त्याला गांधीजींनी विरोध केला त्यामुळे त्यांना अटक झाली , जेल मध्ये भारतीय कैद्यांसाठी एक विशिष्ठ टोपी होती ती घालणे हा नियम होता. गांधीजींनी बाहेर आल्यावर ह्या अत्त्याचाराची सत्याग्रहींना जाणीव व्हावी म्हणून ह्या टोपीचा प्रचार केला. गांधीजींनी कधीही हि टोपी घातली नाही हे हि सत्य आहेच. परंतु भारतीय नेत्यांनी आणि सत्याग्रहींनी या टोपीला स्वीकारले. आणि काँग्रेस पार्टी ने या टोपी सोबत गांधीजींचे नाव जोडले.
भारतीय नेते वेग वेगळ्या प्रकारच्या रंगाच्या टोप्या वापरू लागले जसे सुभाषचंद्र बोस खाकी रंगाची तर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक काळ्या रंगाची आणि समाजवादी पार्टी वाले लाल रंगाची टोपी वापरत.
लेखन -- अमोल तावरे
गांधी टोपी हि शुभ्र पांढरया रंगाच्या खादी च्या कापडा पासून बनवलेली असायची. अशा टोपीसोबत महात्मा गांधींचे नाव जोडून हिला गांधी टोपी म्हणतात परंतु या टोपीच्या निर्मितीचा आणि गांधीजींचा काही हि संबंध नाही. मुळात हि टोपी उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या ठिकाणी खूप पूर्वी म्हणजे गांधीजींच्या जन्माच्या खूप आधी पासून वापरत असत. गांधीजींनी ह्या टोपीचा जास्त प्रसार केला. जेंव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करत होते तेंव्हा इंग्रजान्द्वारे केल्या जाणारया अत्त्याचाराने दुःखी होऊन त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला.त्या वेळी इंग्रजांचा एक नियम होता हाताचे ठसे घेण्याचा त्याला गांधीजींनी विरोध केला त्यामुळे त्यांना अटक झाली , जेल मध्ये भारतीय कैद्यांसाठी एक विशिष्ठ टोपी होती ती घालणे हा नियम होता. गांधीजींनी बाहेर आल्यावर ह्या अत्त्याचाराची सत्याग्रहींना जाणीव व्हावी म्हणून ह्या टोपीचा प्रचार केला. गांधीजींनी कधीही हि टोपी घातली नाही हे हि सत्य आहेच. परंतु भारतीय नेत्यांनी आणि सत्याग्रहींनी या टोपीला स्वीकारले. आणि काँग्रेस पार्टी ने या टोपी सोबत गांधीजींचे नाव जोडले.
भारतीय नेते वेग वेगळ्या प्रकारच्या रंगाच्या टोप्या वापरू लागले जसे सुभाषचंद्र बोस खाकी रंगाची तर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक काळ्या रंगाची आणि समाजवादी पार्टी वाले लाल रंगाची टोपी वापरत.
लेखन -- अमोल तावरे
Post a Comment