सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी 'राज्याभिषेक शक ६१ आनंदनाम संवत्सर, मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदा, भृगुवासर' म्हणजेच इ. स. १५ नोव्हेंबर १७३४, शुक्रवार रोजी मावळ प्रांताच्या 'देशाधिकारी व लेखक' यांच्या नावे लिहीलेले आज्ञापत्र. संताजी बिन रामजी आणि खंडोजी बिन दादजी माणकर तर्फ मोसेखोरे परगणेमजकूर यांच्या सरमोकदमीच्या (सरपाटील) वतनाचा हा ताम्रपट आहे. कागद जिर्ण झाला की फाटून जातो त्यामूळे त्याची 'नकल' बनवावी लागत असे. पण ताम्रपट पिढ्यानपिढ्यांसाठी राहत असे. यामूळे, एकाच पत्राच्या अनेक नकला करून त्या फाटू नयेत म्हणून सांभाळण्याचे काम सोपे झाले.
स्रोत आणि आभार : देवदेवेश्वर संस्थान संग्रहालय, पर्वती, पुणे
Post a Comment