The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » किल्ल्यावरील वास्तू

किल्ल्यावरील वास्तू

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 4 December 2012 | 04:36


किल्ल्यावरील वास्तू :

दारू कॊठार :- हे लोकवस्ती पासुन लांब असे , युध्दजन्यपरीस्थीतीत चटकन उपलब्ध होण्य़ासाठी दारू गोळा काहीप्रमाणात तट्बंदी मध्येही ठेवला जाई जर शत्रूने हल्ला केला तर ईथे आग लावण्य़ात येई.

सदर :- कचेरी - गडाचाकारभार पहाण्यासाठी.

राजवाडा :- येथे राजे येई पर्यत येथे गडाचाकिल्लेदार रहात असे व वाडा जागता ठेवत असे राजे येण्य़ाआधी काही दिवस तो वाडा रिकामा करत असे. नंतर वाड्य़ाची सफ़ाई होत असे. धुप जाळला जाई.

धान्य कॊठार :- तांदूळ , नाचणी ई धान्य साठवले जाई.

लक्कड्खाना :- येथॆ जळाउ माल साठवला जात असे.याचा उपयोग गडावर दिवाबत्ती करण्य़ासाठी हॊत असे.

तेल व तुप टाकी :- येथे तेल व तुप साठवले जाई , जुन्या तुपाचा उपयोग जखमा भरण्य़ासाठी होत असे.

तोफ़खाना :- पावसाळ्य़ात तोफ़ांचे काने भरण्य़ासाठी तोफ़ा येथे गोळाकरत.

पाण्य़ासाठी :- तलाव व टाकी :- प्रत्तेक जमाती साठी वेगवेळी टाकी होती त्यामुळे गडावर एकापेक्षा अनेक टाकी अढळतात. टाकी तोफ़ेच्य़ा मार्‍याने व आवाजाने फ़ुटून त्यातील पाणी वाया जाऊनये म्हणून त्यात अनेक कप्पे केले जात (जर त्यामधील एखादे टाके फ़ुट्ले किंवा चिरले गेले तर सगळे पाणी वाहून जात नसे उदा. अलंग मलंग , रॊहीडा.), [या टाक्य़ांच्य़ा बाजुला काही खोबणी दिसतात पावसाळ्य़ाचा दिवसात या खॊबणीं मध्ये बांबु रॊवुन टाकी झाकत असत. पावसाळ्य़ात गढूळ पाणी मिक्स होऊ नये याच्यासाठी विशेष प्रकारचे चरे घेतअले जात. या मुळे गाळ गाळला जाउन स्वछ पाणई टाकीत साठवले जाई] {टाकी खोदताना मिळालेल्य़ा दगडाचा उपयोग गड बांधणी साठी होत असे.}


Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations