The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » ‎सर्वोत्तम अभियंता राजा...

‎सर्वोत्तम अभियंता राजा...

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 1 January 2013 | 21:18



छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुमारे पस्तीस वर्षाच्या साधरणपणे 360 किल्ले जलदुर्गासह नवे बांधले अथवा जुने दुरुस्त केले.सिँधुदुर्ग,विजयदुर्ग सारखे भरसमुद्रातील जलदुर्ग आजही 350 वर्षे समुद्राच्या भीषण लाटा अंगावर न खचता उभे आहेत.
शिवरायांचे स्थापत्य अभियांत्रिकीमधील ज्ञान व कौशल्य पाहुन अनेक पोर्तुगीज, फ्रेँच, इंग्रज व्यापारी राज्यकर्ते आश्चर्यचकीत झाले होते.सतराव्या शतकातील बांधकाम क्षेत्रातील मर्यादा पाहता शिवरायांनी केलेले अजस्त्र बांधकाम ही एक जागतिक आश्चर्याचीच बाब आहे.जागतिक आश्चर्य म्हणुन आपण चिनी भिँतीचा उल्लेख करतो; परंतु चिनी भिँतीचे बांधकाम सुमारे सहाशे वर्षे चालले होते.शिवरायांनी अवघ्या 35 वर्षात केलेले सर्व प्रकारचे बांधकाम भितीँत विभागल्यास त्याची सुमारे चार हजार किमी लांबीची भिँत होईल. यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्य अभियांत्रिकीमधील निष्णात राजाच म्हणावे लागेल. प्रत्येक बांधकामाची आखणी, बांधकाम, मजबुती उपयुक्तता, सौँदर्य आणि विशेष म्हणजे आयुष्यमान पाहता शिवरायाएवढा तज्ज्ञ स्थापत्य अभियंता दुसरा इतिहासात सापडत नाही..

Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations