The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » युद्धात मरण पावलेल्यांच्या स्त्रियांना वेतन

युद्धात मरण पावलेल्यांच्या स्त्रियांना वेतन

Written By Nikhil Salaskar on Sunday, 20 January 2013 | 01:53



शिवचरित्रातील आणि महाराजांच्या शौर्याचा, बुद्धीचातुर्याचा कळस म्हणजे अफझल प्रकरण. प्रतापगडच्या या युद्धामुळेच खर्या अर्थाने महाराजांची एक प्रबळ शत्रू म्हणून परकीय दाखल घेऊ लागले. या युद्धाचे परिणाम म्हणजे आदिलशाहीच्या अस्ताची आणि महाराजांच्या उदयाची सुरुवात. अफझलखाना बरोबरच त्याचे अनेक सरदार आणि असंख्य सैनिक मराठ्यांनी या युद्धात कापले, त्यांची संपत्ती, शस्त्रे, हत्ती-घोडे काबीज केले आणि एकूणच आपण काय आहोत याची जाणीव परकीय शक्तींना करून दिली.
पण प्रतापगडच्या युद्धा नंतर एक वेगळेच शिवरूप आपल्याला उमजते. महाराजांच्या या अश्याच गुणांमुळे आज त्यांना देवत्व बहाल झाले आहे यात काही दुमत नाही. साडेतीनशे वर्षा पूर्वी अवघ्या ३० वर्षांचा एक युवक असे काही निर्णय घेतो म्हणजे केवळ शब्दातीत आहे.प्रतापगडाच्या युद्धात जे मारले गेले त्यांच्या पुत्रांना महाराजांनी चाकरीत घेतले. ज्यांना पुत्र नव्हते त्यांच्या बायकांना निम्मे वेतन सुरु ठेवले. 

संदर्भ: सभासद बखर आणि शककर्ते शिवराय

अशी व्यवस्था नंतरच्या युद्धांमध्ये सुद्धा सुरु होती असे समजण्यास काही हरकत नाही.
आज pension plans सरकारी कर्मचार्यांना उपलब्ध आहेत पण अशी काहीशी व्यवस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी सुद्धा महाराजांनी शहीद झालेल्या आपल्या सैनिकांसाठी केली होती हे वाचल्यावर आपण अवाक होतो.
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations