पण प्रतापगडच्या युद्धा नंतर एक वेगळेच शिवरूप आपल्याला उमजते. महाराजांच्या या अश्याच गुणांमुळे आज त्यांना देवत्व बहाल झाले आहे यात काही दुमत नाही. साडेतीनशे वर्षा पूर्वी अवघ्या ३० वर्षांचा एक युवक असे काही निर्णय घेतो म्हणजे केवळ शब्दातीत आहे.प्रतापगडाच्या युद्धात जे मारले गेले त्यांच्या पुत्रांना महाराजांनी चाकरीत घेतले. ज्यांना पुत्र नव्हते त्यांच्या बायकांना निम्मे वेतन सुरु ठेवले.
संदर्भ: सभासद बखर आणि शककर्ते शिवराय
अशी व्यवस्था नंतरच्या युद्धांमध्ये सुद्धा सुरु होती असे समजण्यास काही हरकत नाही.
आज pension plans सरकारी कर्मचार्यांना उपलब्ध आहेत पण अशी काहीशी व्यवस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी सुद्धा महाराजांनी शहीद झालेल्या आपल्या सैनिकांसाठी केली होती हे वाचल्यावर आपण अवाक होतो.
Post a Comment