The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » महाराजांच्या आरमार बांधकामावर असलेला पोर्तुगीस

महाराजांच्या आरमार बांधकामावर असलेला पोर्तुगीस

Written By Nikhil Salaskar on Sunday, 20 January 2013 | 02:00


महाराजांनी आरमार बांधणीसाठी पोर्तुगीस नाविकांना नेमले होते अशी माहिती तर आपल्या सर्वांना आहेच पण या पलीकडे त्यांचे काय झाले याची माहिती सहसः कुठे सापडत नाही. भारतातील राजसत्तानकडे म्हण्यासारखे आरमाराच नव्हते आणि म्हणूनच युरोपीय राज्यकर्ते येथे आपल्या वसाहती स्थापू शकले. महाराजांनी आरमार स्थापून युरोपीय, अरबी, सिद्धी, आणि समुद्री चाच्यांना एक प्रकारे अव्हानच दिले होते.कल्याण, भिवंडी आणि पेण येथे महाराज युद्धनौका बांधत असल्याचे काही पुरावे पोर्तुगीस पत्रांमध्ये आढळतात. १६५८-५९ च्या दरम्यान मराठे भिवंडी, कल्याण, आणि पेण येथे वीस गलबतांचे आरमार बांधत होते आणि दांड्याच्या सिद्धीशी युद्ध करण्याची तयारी सुद्धा करीत होते. या आरमाराच्या बांधणीची जबाबदारी महाराजांनी रुय लेईतांव व्हीयेगश या पोर्तुगीस अधिकार्यावर सोपविली होती. या रुय लेईतांव व्हीयेगश बरोबर त्याचा मुलगा फेर्नाव व्हीयेगश आणि तीनशेचाळीस गोरे व काळे सैनिक होते. हे सैनिक आपल्या बायकामुलांसह आणि नोकरांसह महाराजांकडे आरमाराच्या बांधकामावर होते. नंतर हे सर्व पोर्तुगीस, वसईच्या कॅप्टनने त्यांचे कान फुंकल्या कारणाने पळून मुंबईत आश्रयास गेले. 

संदर्भ: शिवछत्रपतींचे आरमार - मेहेंदळे सर
Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations