रांझे गावच्या पाटलाची हकीकत सर्वांनाच माहित आहे, पण हे अर्धसत्य आहे... रांझ्याचा पाटील बावाजी बिन भिकाजी गुजर याने बदअंमल केले म्हणून त्याची मोकादमी जप्त करून त्याचे हात पाय तोडले.नंतर सोनजी गुजर याने अर्ज केला. तेव्हा अर्जाची खात्री करून नंतर जमानत भरल्यावर बावाजीस सोनजीच्या हाती सोपविण्यात आले. बावाजी हा निपुत्रिक होता आणि हातपाय तोडल्यामुळे अपंग सुद्धा. सोनजी सुद्धा गुजर कुळीतील असल्यामुळे आणि बावजीची जबाबदारी स्वीकारल्यामुळे, महाराजांनी मेहेरबान होऊन रांझ्याची मोकादमी सोनजी गुजरास दिली.
संदर्भ: पत्र संग्रह
काही पुस्तकात बावाजी याचे हात पाय तोडल्यावर त्याला कसबा गणपतीच्या मंदिरा बाहेर बसविण्यात आल्याचे लिहितात. पण वरील पत्रावरून खरी हकीकत समजते.
संदर्भ: पत्र संग्रह
काही पुस्तकात बावाजी याचे हात पाय तोडल्यावर त्याला कसबा गणपतीच्या मंदिरा बाहेर बसविण्यात आल्याचे लिहितात. पण वरील पत्रावरून खरी हकीकत समजते.
Post a Comment