The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » » तेरेखोलचा किल्ला

तेरेखोलचा किल्ला

Written By Nikhil Salaskar on Tuesday, 25 December 2012 | 02:44


तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात १८१८ मध्ये असल्याने बाकी किल्ल्यांप्रमाण े या किल्याचे नुकसान झाले नाही. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरु द्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरु द्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच ्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. गोव्यात एकूणच पर्यटन विकासाचा वेग चांगला असल्याने गोवा शासनाने या किल्लायचा हॉटेल मध्ये रुपांतर केले.


Share this article :

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations